डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांचे सुविचार
डॉ.अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते.भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’ यांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. त्यांचे विचार हे आजही तरुण पिढीला प्रेरणा देतात.
ए. पी.जे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.

"स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व कृतीने सत्यात उतरवा. "

"छोटे स्वप्न हाच सर्वात मोठा गुन्हा आहे,स्वप्न आणि ध्येय महान असावे."
"आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या."

"जर तुमचा जन्म पंखांनिशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात,
त्या पंखांनी उदयला शिका."

"संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे."

"महान शिक्षक होण्यासाठी ज्ञान, करुणा आणि आवड आवश्यक आहे."

"आपण झोपेत पाहतो
ते खरं स्वप्न नसतं,
तर आपली झोप उडवतं
ते खरं स्वप्न असतं."
"माणसाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो, तरच तो यशाचा खरा आनंद घेऊ शकतो."
"वाट बघत बसणाऱ्यांना तितकेच मिळते, जितके प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलेले असते."
डॉ. अब्दुल कलाम यांचे सुविचार | APJ Abdul Kalam Quotes in Marathi